Maharashtra Weather: महाराष्ट्रात मान्सूनची झपाट्याने एन्ट्री; कोकण, कोल्हापूर, सातारा जिल्ह्यांना रेड अलर्ट तर काही भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस

2 Min Read
Maharashtra Monsoon Red Alert 2025

Maharashtra Monsoon Red Alert 2025 : यंदा महाराष्ट्रात मान्सूनची लवकर एन्ट्री होत असून कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात हवामान खात्याने रेड अलर्ट जारी केला आहे. हवामान विभागाच्या मते, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत २४ ते २७ मेदरम्यान अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. कमी दाबाच्या क्षेत्रामुळे या भागांत मुसळधार पाऊस, वादळ व गारांचा संभव वर्तवण्यात आला आहे.

रत्नागिरी-दापोली दरम्यानच्या सागरी भागात निर्माण झालेल्या हवामान प्रणालीमुळे कोकणात पावसाचा जोर अधिक वाढला आहे. या पार्श्वभूमीवर समुद्रात मासेमारीसाठी जाणाऱ्या मच्छिमारांना खबरदारीचा इशारा देण्यात आला आहे. “दक्षिण भारतात मान्सूनने जोरदार सुरुवात केली असून महाराष्ट्रातही त्याचा परिणाम दिसून येत आहे.”

तसेच कोल्हापूर, सातारा या जिल्ह्यांनाही रेड अलर्ट देण्यात आला असून, जोरदार वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. या भागांत सतर्कतेच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने स्थानिक यंत्रणांना अलर्टवर ठेवले आहे.

दरम्यान, केरळमध्ये मान्सून २४ मे रोजीच दाखल झाला असून, यंदा तो आठ दिवस आधीच पोहोचला आहे. केरळसह कर्नाटक, तामिळनाडू आणि गोव्यातही जोरदार पावसाचा अंदाज आहे.

राजधानी दिल्लीत रविवारी उशिरा रात्री जोरदार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचले, तर इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर उड्डाणे उशिरा झाली आहेत. तर महाराष्ट्रात विजांच्या कडकडाटासह पावसाचा जोर वाढणार आहे, असा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

बीड, पुणे, नाशिक, अहमदनगर, पालघर या भागांतही हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

🔴 हेही वाचा 👉 शेळी गट वाटप 2025: गाय, म्हैस, शेळ्या, मेंढ्या व कुक्कुटपालन अनुदानासाठी ऑनलाईन अर्ज सुरू, शेवटची तारीख 2 जून.

Share This Article