PM Svanidhi Yojana Loan Without Guarantee : शहरी भागातील छोट्या व्यावसायिकांसाठी केंद्र सरकारने सुरु केलेली प्रधानमंत्री स्वनिधी योजना (PM SVANidhi Yojana) ही अनेकांसाठी खूप फायदेशीर ठरू शकते. या योजनेअंतर्गत कोणत्याही हमीशिवाय फक्त आधार कार्डच्या आधारे त्वरित कर्ज उपलब्ध करून दिल जात. विशेष म्हणजे, हे कर्ज तीन टप्प्यांमध्ये दिल जात असून, या योजनेतून एकूण ८० हजार रुपयांपर्यंत कर्ज मिळू शकत.
कोण लाभ घेऊ शकतो?
चहा विक्रेते, भाजीपाला विक्रेते, फळ विक्रेते, फुटपाथवर दुकाने लावणारे व्यवसायिक अशा अनेक लघु उद्योजकांसाठी ही योजना उपयुक्त ठरते. ज्या व्यक्तीकडे बँकेकडून कर्ज घेण्यासाठी कोणतीही हमी नाही, अशांसाठी ही योजना एक उत्तम पर्याय आहे.
कर्ज प्रक्रिया कशी आहे?
प्रधानमंत्री स्वनिधी योजनेत सहभागी झाल्यावर, सुरुवातीला १० हजार रुपये वर्किंग कॅपिटल म्हणून दिले जाते. हे कर्ज वेळेवर परत केल्यानंतर दुसऱ्या टप्प्यात २० हजार रुपये मिळतात आणि त्यानंतर कर्जाच्या तिसऱ्या टप्प्यात ५० हजार रुपये मंजूर होतात.
व्याज दर आणि सबसिडी
या कर्जावर फक्त ७ टक्के व्याजदर आकारला जातो. विशेष म्हणजे, सरकारकडून या व्याजावर सबसिडीही दिली जाते. यासोबतच डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन देण्यासाठी दरवर्षी १२०० रुपयांपर्यंत कॅशबॅक मिळू शकतो.
अर्ज कसा करायचा?
प्रधानमंत्री स्वनिधी योजनेसाठी स्थानिक शहरी स्वराज संस्था (ULB) किंवा अधिकृत वेबसाइटवरून ऑनलाइन अर्ज करता येतो. अर्ज करताना फक्त आधार कार्ड आणि व्यवसायाची प्राथमिक माहिती आवश्यक असते.
हेही वाचा : महाराष्ट्रातही आता अशी बनणार अंतिम यादी; सरकारचा स्पष्ट संदेश.