Ration Card News Maharashtra: रेशनकार्ड धारकांसाठी महत्वाची सूचना!

2 Min Read
Free Ration Card E Kyc Deadline June 2025 Warning

नवी दिल्ली | ५ जून २०२५: Free Ration Card E Kyc Deadline June 2025 Warning (केंद्र सरकारची मोठी सूचना) – जर तुम्ही रेशन कार्डधारक असाल आणि केंद्र सरकारच्या मोफत रेशन योजनेचा लाभ घेत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी अतिशय महत्वाची आहे. ३० जून २०२५ ही ई-केवायसीसाठी अखेरची तारीख आहे. या तारखेपर्यंत जर ई-केवायसी (e-KYC) पूर्ण केली नाही, तर तुम्हाला मोफत रेशन मिळण बंद होऊ शकत.

मोफत रेशन योजना कोणासाठी?

कोविड काळात सुरू झालेल्या अंत्योदय अन्न योजना (Antyodaya Anna Yojana) या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना दर महिन्याला मोफत गहू, तांदूळ आणि इतर धान्य दिल जात. या योजनेचा संपूर्ण खर्च केंद्र सरकार उचलते.

रेशन कार्डधारकांसाठी ई-केवायसी का अनिवार्य?

सरकारकडून जाहीर करण्यात आलेल्या माहितीनुसार, अनेक रेशन कार्डांमध्ये अप्रासंगिक किंवा बनावट सदस्य असल्याचे आढळून आले आहे. एखाद्या सदस्याचा मृत्यू झालेला असतो, किंवा लग्न होऊन वेगळे राहत असतात, तरीही त्यांच्या नावावर रेशन दिल जात. यामुळे सरकारने सर्व सदस्यांसाठी बायोमेट्रिक ई-केवायसी बंधनकारक केली आहे.

सर्व सदस्यांसाठी अनिवार्य:

तुमच्या रेशन कार्डात जितके सदस्य आहेत – वडील, आई, मुले – प्रत्येकाची केवायसी आवश्यक आहे. जर एकाही सदस्याची ई-केवायसी केली नाही तर, त्याच नाव रेशन कार्डातून हटवले जाईल. आणि ज्यांची रेशन कार्ड केवायसी पूर्ण नसेल त्यांच रेशन कार्ड रद्द होऊ शकत.

30 जून 2025 ही अंतिम तारीख

तारीख लक्षात ठेवा – ३० जून २०२५. ही अंतिम मुदत असून यानंतर ई-केवायसी न झालेल्या लाभार्थ्यांचे मोफत रेशन बंद होईल. त्यामुळे तत्काळ जवळच्या रेशन डीलरकडे जाऊन ई-केवायसी करून घ्या.

रेशनकार्ड ई-केवायसी कशी करावी?

जवळच्या रेशन डीलरकडे जा
POS मशीनवरून प्रत्येक सदस्याचे फिंगरप्रिंट स्कॅन करून ओटीपी किंवा आधार तपासणी केली जाईल
ही प्रक्रिया पूर्णतः मोफत आहे – कुणालाही पैसे देण्याची गरज नाही

महत्वाची सूचना:

केवायसी फक्त एकदाच नव्हे, तर दरवेळी अपडेट ठेवावी लागते (मृत्यू, विवाह, स्थलांतर इ.)
सरकार लाभार्थ्यांची यादी वेळोवेळी अपडेट करत आहे.

हेही वाचा : सरकारचा मोठा निर्णय, लाखो महिलांची नावे यादीतून वगळली जाणार?.

Share This Article