गोल्ड लोन घेणाऱ्या ग्राहकांना RBI चा मोठा दिलासा; एलटीव्ही लिमिटमध्ये वाढ RBI Gold Loan LTV New Rule 2025

3 Min Read
RBI Gold Loan LTV New Rule 2025

मुंबई | ७ जून २०२५: RBI Gold Loan LTV New Rule 2025 — अचानक पैशांची गरज भासल्यास सोन गहाण ठेवून कर्ज घेणाऱ्या लाखो नागरिकांसाठी आरबीआयने एक दिलासादायक निर्णय घेतला आहे. २.५ लाख रुपयांपर्यंतच्या गोल्ड लोनसाठी ‘लोन-टू-वॅल्यू’ (LTV) मर्यादा आता ८५% करण्यात आली आहे, अशी घोषणा केंद्रीय वित्त सेवा सचिव संजय मल्होत्रा यांनी केली आहे. हा निर्णय ६ जून २०२५ रोजी अधिकृतपणे जाहीर करण्यात आला.

काय आहे ‘लोन-टू-वॅल्यू’ : LTV?

LTV म्हणजे तुम्ही जेवढ सोन गहाण ठेवता, त्याच्या बाजारमूल्याच्या तुलनेत तुम्हाला किती कर्ज मिळू शकत, याच प्रमाण. उदाहरणार्थ, जर एखाद्या व्यक्तीकडे २ लाख रुपयांच सोन असेल, तर ८५% LTV प्रमाणात त्याला १.७ लाख रुपये इतक कर्ज मिळू शकत. यापूर्वी ही मर्यादा ७५% होती, त्यामुळे आधी २ लाख रुपयांच्या सोन्यावर फक्त १.५ लाख रुपये कर्ज मिळत होत.

कोणाला होणार याचा फायदा?

ज्यांना अचानक वैद्यकीय, शैक्षणिक किंवा आर्थिक गरजांसाठी पैशांची तातडीने गरज भासते.
ज्यांची क्रेडिट हिस्ट्री नाही तरीही सोने गहाण ठेवून सहज कर्ज घ्यायच असेल.
ग्रामीण भागातील छोटे छोटे व्यापारी, शेतकरी किंवा सामान्य ग्राहक.

बँकर्स आणि वित्त क्षेत्राची प्रतिक्रिया

आरबीआयने ९ एप्रिल रोजी यासंदर्भातील ड्राफ्ट नियमावली प्रसिद्ध केली होती, ज्यावर बँकर्सकडून संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या. त्यांचे म्हणणे होते की जर LTV मर्यादा अधिक घटवण्यात आली असती, तर लोक पुन्हा बेकायदेशीर सावकारांकडे वळले असते. मात्र, आरबीआयने २.५ लाख रुपयांपर्यंतच्या कर्जांवरच सवलत देऊन छोट्या कर्जदारांच संरक्षण करत आर्थिक शिस्तही राखली आहे.

2.5 लाखांपेक्षा जास्त रकमेच्या लोनसाठी काय नियम आहे?

जर कोणी २.५ लाख रुपयांपेक्षा जास्त रकमेच गोल्ड लोन घेऊ इच्छित असेल, तर त्याच्यावर मूळ ७५% LTV मर्यादा लागू राहील. म्हणजेच जर कोणाच्या सोन्याच मूल्य ४ लाख रुपये असेल, तर त्याला जास्तीत जास्त ३ लाख रुपयेच कर्ज मिळेल.

शेअर बाजारावर परिणाम

या निर्णयानंतर गोल्ड लोन सेवा देणाऱ्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये लक्षणीय वाढ पाहायला मिळाली आहे. यामध्ये मुथूट फायनान्स, मणप्पुरम फायनान्ससारख्या कंपन्यांचा समावेश आहे. गुंतवणूकदारांमध्येही या निर्णयाबाबत सकारात्मक वातावरण दिसून येत आहे.

RBI च्या या निर्णयामुळे लघुउद्योजक, सामान्य ग्राहक आणि ग्रामीण भागातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. सोन गहाण ठेवून कर्ज घेण्याची प्रक्रिया आता अधिक सोपी आणि फायदेशीर ठरणार आहे.

हेही वाचा : स्मार्टफोन वापरणाऱ्यांसाठी सरकारचा महत्त्वाचा अलर्ट; तुमचा फोनही यामध्ये आहे का?.

Share This Article