PM Kisan Yojana 20th Installment Latest Update 2025 : पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा 20वा हप्ता जून महिन्यात जारी होण्याची शक्यता असून, याची देशातील कोट्यवधी शेतकरी आतुरतेने वाट पाहत आहेत. या योजनेतून शेतकऱ्यांना दरवर्षी ₹6,000 ची आर्थिक मदत तीन समान हप्त्यांमध्ये दिली जाते. 2019 पासून सुरू असलेल्या या योजनेमुळे शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीशी संबंधित लहान-मोठ्या गरजा भागवण्यासाठी आर्थिक मिळत आहे. मात्र यंदा अनेक शेतकऱ्यांच्या खात्यावर हा हप्ता जमा होणार नाही,
कारण त्यांनी योजनेतील काही आवश्यक प्रक्रिया अद्याप पूर्ण केलेल्या नाहीत.
यामध्ये सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ई-केवायसी आणि भूलेख पडताळणी. ज्या शेतकऱ्यांनी अद्याप आपली ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केलेली नाही, तसेच ज्या शेतकऱ्यांचे जमीन अभिलेख किंवा भूलेख अद्याप डिजिटल माध्यमातून पडताळले गेलेले नाहीत, त्यांना सरकारकडून येणाऱ्या हप्त्याचा लाभ मिळणार नाही. त्याशिवाय, बँक खाते आधार कार्डशी लिंक नसलेल्यांनाही अडचणींचा सामना करावा लागू शकतो. काही प्रकरणांमध्ये, अर्ज करताना चुकीची माहिती भरल्यामुळेही हप्ता रोखला जातो.
मीडिया रिपोर्टनुसार, केंद्र सरकार जून 2025 मध्ये पिएम किसान योजनेचा 20वा हप्ता जारी करू शकते. मात्र अद्याप कोणतीही अधिकृत तारीख जाहीर करण्यात आलेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या अर्जाची स्थिती आणि पात्रतेची माहिती नियमितपणे तपासून घ्यावी. केंद्र सरकारने वेळोवेळी स्पष्ट केले आहे की, लाभार्थी शेतकऱ्यांनी आपली माहिती अचूक आणि अद्ययावत ठेवणे अत्यावश्यक आहे, अन्यथा लाभ थांबवला जाऊ शकतो.
अशा परिस्थितीत, ज्या शेतकऱ्यांनी या प्रक्रियेत दिरंगाई केली आहे, त्यांना आपली माहिती सुधारण्यासाठी तातडीने पावले उचलण्याची गरज आहे. ई-केवायसी करण्यासाठी pmkisan.gov.in या अधिकृत वेबसाइटवर लॉगिन करून ई-केवायसी करता येते. तसेच, भूलेख पडताळणीसाठी संबंधित राज्याच्या कृषी विभागाशी संपर्क साधणे आवश्यक आहे.
सरकारकडून अधिकृत घोषणा होईपर्यंत लाभार्थ्यांनी संयम बाळगावा आणि आपली पात्रता सुनिश्चित करण्यासाठी सर्व आवश्यक पडताळण्या पूर्ण कराव्यात, जेणेकरून 20व्या हप्त्याचा लाभ त्यांना वेळेवर मिळू शकेल.
हेही वाचा : भारतातील अत्यंत गरीब लोकसंख्या आता फक्त ५.४४%! यात महाराष्ट्राचा मोठा वाटा असल्याच स्पष्ट.