Maharashtra Fruit Crop Insurance Mrug Bahar 2025 Application Deadlines : हवामान बदलांमुळे फळपिकांवर होणाऱ्या नुकसानाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारी योजना सुरू झाली आहे. फळपीक विमा योजना – मृग बहार २०२५ साठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून, www.pmfby.gov.in (NCIP पोर्टल) वरून अर्ज करता येणार आहे. अर्जासाठी पिकानुसार वैग-वेगळ्या अंतिम तारखा निश्चित करण्यात आल्या आहेत.
अर्ज करण्याच्या अंतिम तारखा पिकानुसार
लिंबू, द्राक्ष, पेरू, संत्रा: १४ जून २०२५
मोसंबी, चिकू: ३० जून २०२५
डाळिंब: १४ जुलै २०२५
सीताफळ: ३१ जुलै २०२५
विमा संरक्षणाचा हेतू
या योजनेमुळे शेतकऱ्यांना कमी पाऊस, अतिवृष्टी, अवकाळी पाऊस, जास्त आर्द्रता, हवामानातील अनियमितता यामुळे होणाऱ्या फळपिकांच्या नुकसानीसाठी आर्थिक भरपाई मिळू शकते.
अर्जासाठी आवश्यक कागदपत्रे व अटी
योजनेत सहभागी होण्यासाठी खालील बाबी अनिवार्य आहेत:
Agristack नोंदणी क्रमांक
आधार कार्ड
बँक पासबुक
जमीनधारणा उतारा (7/12)
Geo-tag केलेले फोटो
ई-पिक पाहणी नोंदणी
महत्त्वाचे म्हणजे, ई-पिक पाहणी नोंदणी न केल्यास विमा अर्ज अवैध ठरवला जाऊ शकतो. यासाठी पिक विम्यात सहभागी झाल्यानंतर जुलै-ऑगस्ट महिन्यात ई-पिक पाहणी नोंदणी करणे आवश्यक आहे.
मदतीसाठी संपर्क
अधिक माहितीसाठी शेतकऱ्यांनी आपल्या तालुका कृषी अधिकारी कार्यालय, विमा कंपनी कार्यालय किंवा महसूल विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.
हेही वाचा : रेशनकार्डसाठी ई-केवायसीची अंतिम मुदत वाढवली; आता या तारखेपर्यंत संधी.