सरकार २० रुपयांत देत आहे २ लाख रुपयांचा विमा; जाणून घ्या काय आहे ही योजना PM Suraksha Bima Yojana

2 Min Read
PM Suraksha Bima Yojana Coverage Benefits Details

PM Suraksha Bima Yojana Coverage Benefits Details : सरकारकडून गरीब आणि निम्न उत्पन्न गटातील नागरिकांसाठी कमी प्रीमियममध्ये अपघाती विमा संरक्षण देणारी एक महत्त्वाची योजना राबवली जाते — प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना (PM Suraksha Bima Yojana). २०१५ साली केंद्र सरकारने ही योजना सुरु केली होती. आज देशातील करोडो नागरिक या योजनेचा लाभ घेत आहेत.

प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेअंतर्गत केवळ २० रुपये वार्षिक प्रीमियममध्ये अपघाती मृत्यू किंवा पूर्ण अपंगत्व आल्यास २ लाख रुपयांपर्यंत विमा रक्कम दिली जाते. जर अपघातामुळे व्यक्तीचा मृत्यू झाला, तर त्याच्या नॉमिनीला दोन लाख रुपये मिळतात. तसेच, जर विमाधारक आंशिक अपंग झाला, तर त्याला १ लाख रुपयांची रक्कम मिळते. या योजनेत विमा संरक्षणाचा कालावधी १ जून ते ३१ मे असा असते आणि त्यानंतर विमा पुन्हा रिन्यू करणे आवश्यक असते.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराचे वय १८ ते ७० वर्षांच्या दरम्यान असणे आवश्यक आहे. हे विमा संरक्षण बँक खात्याशी थेट लिंक केले जाते, जेणेकरून प्रीमियमची रक्कम थेट बँक खात्यातून कापली जाते आणि नोंदणीही सुलभ पद्धतीने होते.

पिएम सुरक्षा विमा योजनेचा उद्देश गरीब आणि समाजातील अल्प उत्पन्न असणाऱ्या घटकांना अतिशय कमी खर्चात आर्थिक सुरक्षितता देणे हा आहे. अत्यंत कमी प्रीमियममध्ये इतके मोठे अपघाती विमा संरक्षण देणारी ही योजना गरजू नागरिकांसाठी एक मोठा आधार बनली आहे. ज्यांना कोणतेही इतर विमा संरक्षण घेणे शक्य नाही, अशा व्यक्तींसाठी ही योजना नक्कीच फायदेशीर आहे.

हेही वाचा : फक्त ५ वर्षांसाठीच वैध असलेल हे आधार कार्ड कोणासाठी आवश्यक आहे?.

Share This Article