मोदी सरकारचा शेतकऱ्यांना मोठा दिलासा! खरीप पिकांच्या MSP मध्ये वाढ, या 14 पिकांना थेट फायदा Kharif Crop MSP Hike

2 Min Read
Kharif Crop MSP Hike

Kharif Crop MSP Hike : शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारकडून एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे, ज्याचा थेट परिणाम शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर होणार आहे. दिल्लीमध्ये झालेल्या कॅबिनेटच्या बैठकीत घेतलेल्या या निर्णयामुळे किमान आधारभूत किंमतीत वाढ झाल्याने बाजारातील अनिश्चिततेपासून शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. पण नेमक कोणत्या पिकांच्या दरात किती वाढ झाली आणि याचा शेतकऱ्यांना किती फायदा होणार आहे?

2025-26 च्या विपणन हंगामासाठी केंद्र सरकारने 14 खरीप पिकांच्या किमान आधारभूत किंमती (MSP) मध्ये वाढ जाहीर केली आहे. या निर्णयामुळे लाखो शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनासाठी हमीभाव मिळेल, जे उत्पादन खर्चाच्या किमान 1.5 पट असल्याच सरकारच म्हणण आहे. हा निर्णय 2018-19 च्या अर्थसंकल्पातील घोषणेशी सुसंगत असून त्याची अंमलबजावणी आता प्रत्यक्षात होणार आहे.

सर्वाधिक वाढ कोणत्या पिकांमध्ये?

केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्वाधिक MSP वाढ खालील पिकांमध्ये झाली आहे:

नायजर बियाणे – ₹820 प्रति क्विंटल वाढ
रागी – ₹596 प्रति क्विंटल वाढ
कापूस – ₹589 प्रति क्विंटल वाढ
तीळ – ₹579 प्रति क्विंटल वाढ

याशिवाय बाजरी, मका, तूर आणि उडीद यांसारख्या पिकांवरही उत्पादन खर्चाच्या तुलनेत 50% ते 60% दरम्यान नफा मिळेल, अस सरकारन स्पष्ट केल आहे.

या निर्णयाचा नेमका फायदा काय?

MSP वाढल्यामुळे बाजारभावांपेक्षा हमीभावाने शेतमालाची विक्री करता येणार
अनिश्चित बाजारव्यवस्थेपासून शेतकऱ्यांच संरक्षण
उत्पन्न वाढीची आणि नफा मिळवण्याची संधी
ग्रामीण भागातील आर्थिक चक्राला गती

🔴 हेही वाचा 👉 या योजनेत एकदाच गुंतवणूक करा आणि मिळवा दरमहा 9,250 रुपये! जाणून घ्या काय आहे ही योजना.

Share This Article