PM Vishwakarma Yojana: या योजनेअंतर्गत सरकारकडून १५ हजार रुपये कशासाठी दिले जातात?

2 Min Read
PM Vishwakarma Yojana Toolkit

PM Vishwakarma Yojana Toolkit : पारंपरिक व्यवसाय करणाऱ्या कुशल कामगारांसाठी भारत सरकारने सुरू केलेली प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना आता ग्रामीण आणि शहरी भागातील अनेक लोकांसाठी उपयुक्त ठरत आहे. या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना प्रशिक्षणासोबत आर्थिक सहाय्यदेखील मिळते. यातील एक महत्त्वाचा भाग म्हणजे सरकारकडून दिले जाणारे १५ हजार रुपयांचे अनुदान, जे ‘टूलकिट’ खरेदीसाठी दिले जाते.

कोण लाभ घेऊ शकतात?

ही योजना १८ पारंपरिक व्यवसायांशी संबंधित असलेल्या व्यक्तींसाठी लागू आहे. अर्ज करणाऱ्याचे वय किमान १८ वर्षे असणे आवश्यक आहे. खालील व्यवसायांमध्ये कार्यरत असणाऱ्या लोकांना या योजनेचा लाभ मिळू शकतो:

लोहार, सुतार
न्हावी (केस कापणारे), धोबी
सोनार काम करणारे
मूर्तिकार, खलाशी (नाव बांधणारे)
टोपली, चटई किंवा झाडू तयार करणारे
खेळणी, मातीपासून मूर्ती बनवणारे
कुलूप बनवणारे, मच्छीमारी जाळी तयार करणारे
पादत्राणे (चप्पल/बूट) बनवणारे

योजनेअंतर्गत काय लाभ मिळतो?

एकदा अर्ज मंजूर झाल्यानंतर लाभार्थ्यांना खालील फायदे मिळतात:

कौशल्य प्रशिक्षण – व्यवसाय सुधारण्यासाठी काही दिवसांच प्रशिक्षण
स्टायपेंड – प्रशिक्षणाच्या काळात दररोज ५०० रुपये
कर्ज सुविधा – प्रथम टप्प्यात १ लाख रुपये आणि नंतर २ लाखांपर्यंतचे कर्ज
१५,००० रुपयांच टूलकिट सहाय्य – व्यवसायासाठी आवश्यक साहित्य खरेदीसाठी

१५,००० रुपयांच टूलकिट सहाय्य म्हणजे काय?

या योजनेतील सर्वांत चर्चेतील बाब म्हणजे योजनेतून मिळणारे १५,००० रुपये, जे सरकारकडून टूलकिट खरेदीसाठी अनुदान म्हणून दिले जातात. यामुळे लाभार्थ्यांना आपल काम अधिक चांगल्या प्रकारे आणि व्यावसायिक पद्धतीने करता याव.

हे टूलकिट संबंधित व्यवसायासाठी आवश्यक असलेली औजारे, उपकरणे किंवा साहित्य खरेदी करण्यासाठी वापरले जाऊ शकते. पारंपरिक कौशल्य असलेल्या कामगारांना नव्या तंत्रज्ञानाची जोड मिळावी आणि त्यांचा व्यवसाय अधिक सक्षम व्हावा हा सरकारचा हेतू आहे.

हेही वाचा : Girl Child Saving Plan 2025: मुलीच्या शिक्षण व लग्नासाठी ‘या’ शासकीय योजनेत गुंतवणूक करा, मिळतोय उत्तम परतावा.

Share This Article