Devendra Fadnavis Cibil Warning To Banks : राज्य सरकारच्या स्पष्ट निर्देशांनंतरही शेतकऱ्यांकडून CIBIL स्कोअर मागणाऱ्या बँकांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज जोरदार टीका केली. “शेतकऱ्यांकडून CIBIL मागू नका, हे मी अनेकदा सांगितलय. तरीही तुम्ही विचारता, मग यावर तोडगा सांगा,” अशा शब्दांत त्यांनी प्रमुख खासगी बँकांना सुनावल.
आज मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय बँकर्स समितीची बैठक पार पडली. या बैठकीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि विविध बँकांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
बँकांना थेट इशारा
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, “जर कोणतीही बँक शाखा शेतकऱ्यांकडून CIBIL स्कोअर मागत असेल, तर त्या शाखेवर कारवाई करण्यात येईल, असा स्पष्ट निर्णय आजच घेतला पाहिजे.”
त्यांनी Axis Bank, ICICI Bank, HDFC Bank यांना थेट उद्देशून फटकारले.
44.76 लाख कोटींचा पतपुरवठा आराखडा मंजूर
या बैठकीत ₹44.76 लाख कोटींच्या वार्षिक पतपुरवठा आराखड्याला मंजुरी देण्यात आली. मुख्यमंत्री म्हणाले, “गंभीरतेने बँकांनी भूमिका घ्यावी. रिझर्व्ह बँकेनेही यासंदर्भात स्पष्ट निर्देश दिले आहेत.”
गुंतवणुकीचा ओघ आणि कृषी विकासावर भर
फडणवीसांनी नमूद केल की, “सध्या दुष्काळाची स्थिती नाही. यंदा चांगल्या पिकांची शक्यता आहे. त्यामुळे बँकांनी शेतकऱ्यांना अधिक सहकार्य करायला हवे.”
महाराष्ट्रात FPO सर्वाधिक आहेत
MSMEs मध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक
दावोसहून 16 लाख कोटींची गुंतवणूक महाराष्ट्रात आली आहे
महाराष्ट्र आता स्टार्टअप हब म्हणून उदयास येत आहे
पुढील बैठकीत कार्यक्षमतेचा आढावा
“सरकार आणि बँकांचा समन्वय महत्त्वाचा आहे. सरकारी योजना प्रभावीपणे अंमलात आणणाऱ्या बँकांना सन्मानित करा. जे दुर्लक्ष करतील, त्यांची नावे घ्या व पुढील बैठकीत नाराजी व्यक्त करा,” असा सल्लाही फडणवीसांनी दिला.
🔴 हेही वाचा 👉 20वा हप्ता मिळणार? स्टेटस तपासण्याची पद्धत जाणून घ्या.