MahaDBT Farmer Scheme 2025 News : खरिपाच्या तयारीत असलेल्या हजारो शेतकऱ्यांसाठी एक मोठी दिलासादायक बातमी आहे. सरकारने 145 कोटींचा निधी मंजूर केला आहे, पण याचा थेट फायदा नेमका कोणत्या शेतकऱ्यांना होणार? आणि कोणती कागदपत्रे लागणार? संपूर्ण माहिती जाणून घ्या…
खरीप हंगाम 2025 साठी कृषी विभागाने ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ या तत्वावर विविध योजनांतर्गत नाशिक विभागातील 20,170 शेतकऱ्यांची निवड केली आहे. या निवडीत वैयक्तिक शेततळे, सूक्ष्म सिंचन, फलोत्पादन, कृषी यांत्रिकीकरण अशा योजनांचा समावेश आहे. या शेतकऱ्यांना 145.62 कोटी रुपयांचा थेट आर्थिक लाभ मिळणार आहे.
मात्र निवड झालेल्या शेतकऱ्यांनी 31 मे 2025 पर्यंत महाडीबीटी पोर्टलवर आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केली पाहिजे. अन्यथा त्यांचा अर्ज रद्द केला जाईल. लाभार्थ्यांची यादी कृषी विभागाच्या संकेतस्थळावर व महाडीबीटी पोर्टलवर पाहता येईल. योग्य कागदपत्रे सादर केल्यानंतर अंतिम मंजुरी दिली जाईल.
🔴 हेही वाचा 👉 आता एकाच कुटुंबातील दोन सदस्यांना मिळणार ‘PM आवास योजने’चा लाभ! नवीन नियम काय सांगतो? जाणून घ्या.