Kanyadan Yojana Marriage Aid Scheme : मुलीच्या लग्नासाठी आर्थिक अडचण येऊ नये म्हणून महाराष्ट्र सरकारने एक महत्त्वाची आणि दिलासा देणारी योजना सुरू केली आहे. ‘कन्यादान योजना’ या नावाने ओळखली जाणारी ही योजना अनुसूचित जातीतील गरीब कुटुंबातील मुलींच्या लग्नासाठी विशेष आर्थिक मदत देते. पण ही मदत कोणाला, कशी, आणि किती मिळते? हे जाणून घेण गरजेच आहे.
‘कन्यादान योजना’ काय आहे?
राज्य सरकारची कन्यादान योजना ही विशेषतः अनुसूचित जातीतील गरीब कुटुंबातील मुलींच्या लग्नासाठी आहे. या योजनेअंतर्गत सामूहिक विवाह सोहळ्यांद्वारे नवविवाहित जोडप्यांना ₹20,000 पर्यंत आर्थिक मदत दिली जाते. ही रक्कम मुलीच्या आईवडिलांच्या नावाने दिली जाते, जेणेकरून लग्नाचा खर्च थोडासा हलका होतो.
यासोबतच सामूहिक विवाह सोहळ्याच आयोजन करणाऱ्या संस्थेलाही ₹4,000 प्रोत्साहनरूप मदत दिली जाते.
Kanyadan Yojana पात्रता काय आहे?
या योजनेचा लाभ घेण्यासाठी काही अटींच पालन करण गरजेच आहे:
वधू-वर महाराष्ट्राचे रहिवासी असावेत.
वधू किंवा वर यापैकी किमान एकजण अनुसूचित जातीचा असावा.
वराच वय किमान २१ वर्ष, आणि वधूच वय १८ वर्षांपेक्षा जास्त असण आवश्यक आहे.
हा प्रथम विवाह असावा.
लाभार्थ्यांनी बाल विवाह प्रतिबंध कायदा किंवा हुंडा प्रतिबंध कायदा यांचा भंग केलेला नसावा.
जातींचे प्रमाणपत्र असणे आवश्यक.
अर्ज कुठे करायचा?
कन्यादान योजनेअंतर्गत सामूहिक विवाह सोहळ्यात सहभागी होण्यासाठी स्थानिक सामाजिक न्याय विभाग किंवा जिल्हा समाज कल्याण कार्यालयाशी संपर्क साधावा. अनेकदा हे सोहळे विश्वासार्ह स्वयंसेवी संस्थांमार्फत राबवले जातात, त्यामुळे स्थानिक कार्यालयात जाऊन माहिती घेण सोयीच ठरेल.
ही योजना का महत्त्वाची आहे?
भारतीय समाजात मुलीच्या लग्नाचा खर्च हे एक मोठ आव्हान मानल जात. अशा परिस्थितीत राज्य सरकारकडून मिळणारी ही रक्कम केवळ आर्थिक मदत नसून, सामाजिक समतेचा संदेशही आहे. विशेषतः गरीब, मागासवर्गीय समाजातील मुलींसाठी ही योजना खूप महत्वाची आहे.
हेही वाचा : आयुष्मान भारत योजनेअंतर्गत तुमच्या भागात कोणत्या रुग्णालयांमध्ये मिळतो मोफत उपचार? येथे पहा संपूर्ण यादी.