लाडकी बहिण योजनेतील गडबड मान्य; उपमुख्यमंत्री अजित पवार यांच मोठ वक्तव्य Ladki Bahin Yojana 11th Installment Ajit Pawar Statement

2 Min Read
Majhi Ladki Bahin Yojana 11th Installment Ajit Pawar Statement

मुंबई | ३ जून २०२५: Majhi Ladki Bahin Yojana 11th Installment Ajit Pawar Statement – माझी लाडकी बहिण योजना राबवताना पात्रता पडताळणी न करता आर्थिक मदत दिली गेली, ही मोठी चूक झाली होती, असे स्पष्ट वक्तव्य राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत केले आहे. महिलांच्या खात्यात दरमहा ₹१५०० जमा करणाऱ्या या योजनेच्या अंमलबजावणीत गडबड झाली असल्याचे त्यांनी खुलेपणाने मान्य केले.

लाडकी बहीण योजनेच्या ११व्या हप्त्याची रक्कम अद्याप महिलांच्या खात्यात जमा झालेली नसून लाभार्थी महिलांना ११व्या हप्त्याची तीव्र प्रतिक्षा आहे. याच पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी योजना राबवताना काही अपात्र महिलांनाही लाभ मिळाल्याचे कबूल केले आहे. त्यांनी स्पष्ट केले की, आता अर्जांची तपासणी सुरू असून, केवळ पात्र आणि गरजू महिलांनाच इथून पुढे लाभ दिला जाईल.

“सर्व अर्जदार महिलांना न तपासता आर्थिक मदत देणे ही आमची घाई होती. निवडणुका तोंडावर होत्या, त्यामुळे वेळेअभावी अशी परिस्थिती निर्माण झाली. मात्र आता केवळ गरजू महिलांनाच लाभ मिळेल याची खात्री केली जाईल,” असे अजित पवार म्हणाले.

अपात्र लाभार्थ्यांचे प्रकरण समोर

लाडकी बहीण योजनेतील अनेक गैरप्रकार समोर आले असून, २,२८९ सरकारी कर्मचाऱ्यांनी या योजनेचा गैरलाभ घेतल्याचे महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे (Aditi Tatkare) यांनी नुकतेच उघड केले. या योजनेचा उद्देश गरजू, आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांना मदत करणे हा होता, मात्र पात्रतेशिवाय अनेक महिलांनी लाभ घेतल्याचे समोर आले आहे.

पैसे परत घेणार नाही

अजित पवार यांनी स्पष्ट केले की, आतापर्यंत अपात्र महिलांच्या खात्यात जमा झालेली रक्कम परत मागितली जाणार नाही. मात्र यापुढे कोणत्याही चुकीला थारा नाही, अशी कार्यवाही केली जाईल.

योजनेचा उद्देश आणि सुरुवात

जुलै २०२४ मध्ये ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना’ सुरू करण्यात आली होती. ही योजना २१ ते ६५ वर्षे वयोगटातील अशा महिलांसाठी आहे, ज्यांचे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न ₹२.५ लाखांपेक्षा कमी आहे. १ जुलै २०२४ पासून योजना अंमलात आली असून, सप्टेंबरपासून योजनेचे हप्ते जमा होऊ लागले.

हेही वाचा : महाराष्ट्रात यंदा सरासरीपेक्षा अधिक पाऊस; मात्र काही जिल्ह्यांमध्ये खंडाची शक्यता.

Share This Article