Ration Card Ekyc Deadline Extended Till 30 June 2025 Maha Govt : शिधापत्रिकाधारकांसाठी सरकारने सक्तीची केलेली ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी दिलेली अंतिम मुदत ३० एप्रिल होती. मात्र अद्याप लाखो लाभार्थ्यांची ई-केवायसी प्रक्रिया अपूर्ण असल्याने, राज्य सरकारने ही मुदत ३० जून २०२५ पर्यंत वाढवली आहे.
‘मेरा केवायसी’ अॅपद्वारे घरबसल्या करा ई-केवायसी
ई-केवायसीसाठी सरकारने ‘मेरा केवायसी’ नावाचे अॅप तयार केले आहे. या अॅपवर शिधापत्रिकाधारकांनी आधार क्रमांक टाकून ओटीपी व्हेरिफिकेशन, इतर तपशील भरून व फेस व्हेरिफिकेशन करून ही प्रक्रिया पूर्ण करावी लागते.
ई-केवायसी पूर्ण न झाल्यास धान्य वितरणात अडथळा
शासनाच्या आदेशानुसार, ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण झाल्याशिवाय शिधापत्रिकेवर धान्य मिळणार नाही. त्यामुळे अद्याप ई-केवायसी न केलेल्या शिधापत्रिकाधारकांनी लवकरात लवकर ही प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन पुरवठा विभागाने केले आहे.
हेही वाचा : महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढला; या जिल्ह्यांना रेड अलर्ट, विजांमुळे 9 जणांचा मृत्यू.