Biyane Vatap Yojana 2025: शेतकऱ्यांसाठी खुशखबर! १००% अनुदानावर बियाणे वाटपास मुदतवाढ, आज अर्जासाठी शेवटची संधी

1 Min Read
Biyane Vatap Yojana 2025 Deadline Extended Apply Online

Biyane Vatap Yojana 2025 Deadline Extended Apply Online : खरीप हंगाम जसजसा जवळ येतोय, तसतशी शेतकऱ्यांची बियाण्याची धावपळ सुरू झाली आहे. अशातच राज्य सरकारकडून शेतकऱ्यांसाठी एक मोठा दिलासा देणारी घोषणा करण्यात आली आहे. १०० टक्के अनुदानावर बियाणे वाटप योजनेसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे.

या योजनेंतर्गत अर्ज करण्याची अंतिम तारीख ३१ मे २०२५ होती. मात्र आता कृषी विभागाने ती २ जून २०२५ पर्यंत वाढवली आहे, म्हणजेच शेतकऱ्यांकडे अर्ज करण्यासाठी आज शेवटची संधी आहे.

काय आहे योजना?

“महाडीबीटी – शेतकरी योजना” पोर्टलवरून खरीप हंगाम २०२५ साठी पात्र शेतकऱ्यांना १००% अनुदानावर प्रमाणित बियाण्यांचे वाटप करण्यात येणार आहे. ही योजना प्रथम अर्ज, प्रथम सेवा या तत्त्वावर आधारित आहे. त्यामुळे लवकर अर्ज केल्यास निवड होण्याची शक्यता अधिक आहे.

कोणते बियाणे मिळणार?

सोयाबीन
तूर
मूग
उडीद
मका
बाजरी
भात इत्यादी.

बियाणे वाटप कधी होणार?

सोडत कालावधी: ३ ते ५ जून २०२५ दरम्यान.
लाभार्थ्यांची निवड झाल्यास नोंदणीकृत मोबाईल नंबरवर SMS द्वारे माहिती दिली जाईल.
फक्त निवड झालेल्या शेतकऱ्यांनाच अनुदानित बियाणे मिळणार.

अर्ज कसा करावा?

  1. महाडीबीटी पोर्टलवर लॉगिन करा:
    https://mahadbt.maharashtra.gov.in/Farmer/AgriLogin/AgriLogin
  2. शेतकरी योजना टॅबमध्ये ‘बियाणे वाटप’ योजना निवडा
  3. वांछित पिकाचे बियाणे निवडा व पूर्ण अर्ज भरा

हेही वाचा : मिनी ट्रॅक्टरसाठी ९०% अनुदान, अर्ज करण्याची अंतिम तारीख ३० जून २०२५.

Share This Article