Aadhaar Update Guidelines 2025 : तुमच आधार कार्ड गेल्या काही वर्षांपासून जसच्या तस आहे का? नाव, पत्ता किंवा जन्मतारीख यात कोणताही बदल न झाल्यामुळे तुम्ही ते अपडेट करण्याच टाळत असाल, तर आता सावध व्हा. महाराष्ट्रातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांकडून UIDAI च्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार नागरिकांना 10 वर्षांमध्ये एकदा आधार अपडेट करण गरजेच असल्याची सूचना देण्यात आली आहे. अन्यथा, कार्ड तात्पुरत निलंबित होण्याचा धोका आहे.
राज्यभरातील जिल्ह्यांमध्ये सुरू असलेल्या आधार अपडेशन मोहिमेअंतर्गत, स्थानिक प्रशासन, जिल्हा परिषदा, आणि नगर परिषदांमार्फत नागरिकांना आधार अपडेटसाठी प्रोत्साहन दिल जात आहे. विशेषतः 5 ते 7 आणि 15 ते 17 वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी शाळांमध्ये विशेष आधार अपडेट कॅम्प आयोजित करण्यात येणार आहेत.
UIDAI च्या माहितीनुसार, महाराष्ट्रात सध्या 4000 हून अधिक आधार केंद्रांवर नावनोंदणी आणि अपडेट सेवा सुरू आहेत. बँका, पोस्ट ऑफिस, सीएससी केंद्र, आणि काही शासकीय कार्यालयांतूनही ही सेवा दिली जाते.
मोफत सेवा आणि शुल्कबाबतचे अधिकृत नियम खालीलप्रमाणे आहेत:
नाव, पत्ता, जन्मतारीख, लिंग, मोबाईल नंबर, ईमेल अपडेट: ₹50
बायोमेट्रिक अपडेट (17 वर्षांवरील नागरिकांसाठी): ₹100
5-7 आणि 15-17 वयोगटासाठी आधार अपडेट: पूर्णपणे मोफत
अनेक नागरिकांना यासंदर्भात माहिती नसल्यामुळे त्यांच्याकडून यासाठी अवास्तव रक्कम वसूल केल्याचे प्रकार समोर येत आहेत. काही ठिकाणी आधार कार्ड बनवण्यासाठी 1-2 हजार रुपये मागितल्याच्या तक्रारी स्थानिक पोलिस ठाण्यांमध्ये दाखल झाल्या आहेत. प्रशासनाने नागरिकांना अधिकृत आधार केंद्रांवरच जाऊन सेवा घेण्याच आवाहन केल आहे.
काय अपडेट करता येऊ शकत आणि किती वेळा?
जन्मतारीख: 1 वेळ
नाव: 2 वेळा
लिंग: 1 वेळ
पत्ता, मोबाईल, ईमेल: कितीही वेळा (पुरावे आवश्यक)
निष्कर्ष: महाराष्ट्रातील नागरिकांनी आधार कार्ड वेळोवेळी अपडेट करून त्यातील माहिती अचूक ठेवण आवश्यक आहे. केवळ शासकीय केंद्रांवरच या सेवेचा लाभ घ्यावा आणि अनधिकृत एजंटांकडून किंवा दलालांकडून कोणतीही फसवणूक होऊ नये, यासाठी जागरूक राहाव. कोणतीही शंका असल्यास UIDAI च्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
🔴 हेही वाचा 👉 50,000 महिलांना मिळणार मोफत शिलाई मशीन? महिलांसाठी सुवर्णसंधी! जाणून घ्या काय आहे योजना….