आधारनंतर सरकारचा मोठा निर्णय! प्रत्येक नागरिकासाठी ‘डिजिटल पत्ता’ लवकरच अनिवार्य होणार? Digital Address ID India Launch

2 Min Read
Digital Address ID India Launch

Digital Address ID India Launch : आधार कार्डनंतर आता भारत सरकारकडून आणखी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलल जात आहे. देशातील प्रत्येक नागरिकासाठी लवकरच ‘डिजिटल अ‍ॅड्रेस आयडी’ (Digital Address ID) प्रणाली सुरू होण्याची शक्यता आहे. ही योजना पोस्ट खात्याद्वारे विकसित केली जात असून पंतप्रधान कार्यालयाच्या देखरेखीखाली आहे. यामुळे महाराष्ट्रातील शहरी आणि ग्रामीण भागातील नागरिकांच्या पत्त्यांच्या अचूकतेत प्रचंड सुधारणा होण्याची अपेक्षा आहे.

काय असेल ‘डिजिटल अ‍ॅड्रेस आयडी’?

नवीन डिजिटल पत्ता प्रणाली अंतर्गत प्रत्येक व्यक्तीचा QR कोड स्वरूपात डिजिटल पत्ता तयार केला जाईल. यामुळ सरकारी योजना, कुरिअर सेवा, ऑनलाइन खरेदी, फूड डिलिव्हरी अशा अनेक सेवांमध्ये अचूकता आणि वेग येणार आहे. आजवर चुकीच्या पत्त्यांमुळे होणाऱ्या गैरसोयी आणि आर्थिक नुकसानीला यामुळे आळा बसेल.

नागरिकांची संमती अनिवार्य

या प्रणालीत नागरिकांची गोपनीयता लक्षात घेण्यात आली असून, डिजिटल अ‍ॅड्रेस शेअर करताना व्यक्तीची संमती आवश्यक असणार आहे. याशिवाय डेटा सुरक्षेवर विशेष भर दिला जाईल, जेणेकरून कोणाच्याही पत्त्याचा गैरवापर होणार नाही.

ही प्रणाली अधिक पारदर्शक आणि बंधनकारक करण्यासाठी सरकार लवकरच संसदेत यासंदर्भात कायदा सादर करू शकते. यामुळ एक स्वतंत्र प्राधिकरण स्थापन करून डिजिटल पत्त्यांच व्यवस्थापन केल जाईल.

डिजिटल इंडिया मोहिमेला बळ

आधार आणि यूपीआय नंतर आता डिजिटल अ‍ॅड्रेस आयडीमुळे डिजिटल इंडिया मोहिमेला आणखी गती मिळणार आहे. नागरिकांची ओळख आणि पत्ता यांची खात्रीशीर नोंद सरकारकडे राहिल्याने विविध सेवा अधिक प्रभावीपणे पोहोचवता येणार आहेत.

🔴 हेही वाचा 👉 सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी संधी! NPS सदस्य आता घेऊ शकणार युनिफाइड पेन्शन योजनेचा लाभ – 30 जूनपर्यंत फक्त करा हे काम.

Share This Article