Shiv Bhojan Yojana : महाराष्ट्रातील गरीब व गरजू नागरिकांसाठी सुरू असलेल्या शिवभोजन थाळी योजनेबाबत अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी मोठ वक्तव्य केल आहे. “शिवभोजन थाळी योजना बंद होणार नाही,” अस त्यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे.
भुजबळ यांनी नुकताच अन्न व नागरी पुरवठा मंत्रालयाचा कार्यभार स्वीकारला. यावेळी त्यांनी शिवभोजन योजनेबाबत निर्माण झालेली साशंकता दूर करत सरकारच्या कल्याणकारी भूमिकेची पुनर्रचना केली.
“शिवभोजन थाळी योजना बंद करण्याबाबत चर्चा ऐकल्या होत्या. मी स्वतः मुख्यमंत्र्यांशी भेट घेऊन त्यांना सांगितल की, ही योजना दोन लाखांहून अधिक लोकांना दररोज एक वेळच जेवण पुरवते. त्यामुळे ही योजना गरजूंसाठी अत्यंत महत्त्वाची आहे आणि सरकारची प्रतिमा उंचावण्यासही मदत करते,” असे भुजबळ म्हणाले.
त्यांनी योजनेच्या खर्चाबाबतही माहिती दिली. “या योजनेसाठी सरकारचा अंदाजे खर्च १४० ते १५० कोटी रुपये आहे. मात्र, योजनेचा सामाजिक फायदा लक्षात घेता हा खर्च योग्य आहे,” असही त्यांनी स्पष्ट केल.
दक्षिण भारतातील अन्न सुरक्षा योजनांचे उदाहरण देत त्यांनी सांगितले की, “तेथे अनेक वर्षांपासून अशा योजना सुरु आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातही ही योजना राबवण योग्यच आहे.”
भुजबळ यांनी आणखी एक महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केला – योजनांचा गैरवापर. त्यांनी सांगितले की, अनेकदा अपात्र व्यक्तींना योजनेचा लाभ मिळतो. यासाठी एक समिती स्थापन करण्यात आली असून, त्या माध्यमातून फक्त पात्र लाभार्थ्यांनाच फायदा मिळावा यासाठी कार्यवाही केली जाईल.
भुजबळांनी हेही स्पष्ट केल की, महायुती सरकारमध्ये कोणतीही योजना रद्द करण्यात आलेली नाही. आर्थिक अडचणींचा विचार करून काही समायोजन केल जात, जसं एखाद्या कुटुंबात होत.
“शिवभोजन थाळी योजना सुरूच राहणार आहे आणि भविष्यात अधिक प्रभावीपणे राबवण्यासाठी आम्ही केंद्र सरकारकडे समर्थनासाठी प्रस्तावही दिले आहेत,” अस भुजबळ यांनी सांगितल.
🔴 हेही वाचा 👉 घरकुल योजनेतून आता मिळणार जागा + घर.